नागार्जुना अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ व्याख्यानमालेचा थाटात समारोप.

मैत्रेय शैक्षणिक संस्थेव्दारा संचलित नागार्जुना इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट महाविदयालयात ‘भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ व्याख्यानमालेचे तिसरे व अंतिम पुष्प डॉ. ज्वाला डोहाने यांनी गुंफले. ‘भगवान बुद्ध आणि त्यांचे तत्त्वज्ञान’ याविषयावर त्यांनी भाष्य केले. उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. विचारमंचावर प्रमुख पाहुण्या डॉ. ज्वाला डोहाने, प्रा. नीलिमा गजभिये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. रहांगडाले, कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. हर्षा मेश्राम व संयोजक डॉ. नितीन श्रीगिरीवार उपस्थित होते.
बुद्ध जयंतीचे औचित्य साधून प्रा. सुधीर गोवर्धन यांनी ‘ज्ञान व चेतना एक वैद्यांनीक दृष्टीकोन” या विषयावर आपले विचार व्यक्त केले. प्रा. अमित मेश्राम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.
सत्य समजण्याचा मार्ग म्हणजे धम्म आहे. बुद्ध धम्मातील सम्यक दृष्ट्या, सम्यक विचार, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृति आणि सम्यक समाधी या आठ गोष्टी (अष्टांगिक मार्ग) ह्या गौतम बुद्धांनी सांगितलेल्या वासना, राग,द्वेष, इत्यादी दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग असल्याचे प्रतिपादन डॉ. ज्वाला डोहाने यांनी केले.
मनुष्याने नेहमीच सत्यसदाचारी असावे. स्वतःला समजण्याची व माणुसकीला समजून घेण्याच्या कलेद्वारे स्वानुभव साध्य करता येते. त्याचप्रमाणे सध्याच्या युध्दजन्य परिस्थितीत पुनःच शांती प्रस्तापित करण्याकरिता जगाला भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची अत्यंत आवश्यकता आहे असे डॉ. एम. के. रहांगडाले यांनी आपल्याला अध्यक्षीय भाषणात सांगितले.
मैत्रेय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, मा. श्री. अजय बी. वाघमारे, सचिव मा. श्री. प्रदीप के. नगरारे व कोषाध्यक्ष, मा. श्री. कुलदीप पी. रामटेके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करीता आयोजन करणाऱ्या समस्तांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. नितीन श्रीगिरीवार यांनी केले व प्रा. हर्षा मेश्राम यांनी आभार मानले.

